अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. दर महिन्याला घोटाळेबाज या शिक्षण घोटाळ्यातून सरकारी तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतायत. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे हे घोटाळे समोर येतात सुद्धा मात्र शिक्षण विभागातील अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे घोटाळे समोर येत असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. तर दुस-या बाजूला पगाराचा बोजा वाढतो म्हणून गेल्या तीन दशकांपासून शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतंय. हे घोटाळेबाज कोण आहेत. त्यांची घोटाळा करण्याची मोडस ऑपरेंडी काय आहे.
2012 मध्ये सरकारने शिक्षक भरती बंद केली. मात्र त्याआधीच्या शाळा आणि त्यातल्या शिक्षकांना आजही मान्यता दिली जाते. याचाच फायदा उचलला तो घोटाळेबाजांनी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असं गोंडस लेबल लावून कोर्टात जातात. त्यानंतर शिक्षण विभागाला भरतीचे आदेश दिले जातात. शिक्षकांची जुनी भरती दाखवत भरतीची मान्यता मिळवली जाते असे गैरप्रकार केले जात असल्याचा आरोप आहे.
भरती बंद झाल्यानंतर शासन सध्या शाळा चालवण्यासाठी कुठलाही खर्च देत नाही. तसंच पगारही शिक्षकांना मिळत नसल्याने लाखोंचा मिळणारा मलिदा शिक्षण संस्था चालकांना बंद झाला. या सर्व व्यवहारात शिक्षण विभागातील बेकायदेशीर कामे करणारे एजंट हुशार झाले. ग्रामीण भागातील शाळा शोधून त्यांनी स्वतः काही शाळा चालवण्यासाठी नावाने 'हस्तांतरित' करून घेतल्या.
एका जिल्ह्यात 60 कोटी तर 36 जिल्ह्यांमधल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा किती भुर्दंड बसत असेल या आकड्याची कल्पनाही करवत नाही.Exclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश
Jalgaon Teachers Recruitment Scam Jalgaon Scam Teacher Recruitment Scam शिक्षक भरती घोटाळा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »