मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उभारण्यात येत आहे. कोस्टल रोड पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत वाहतुक सुरू झाली आहे. त्यानंतर आता कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. यासाठी पहिली तुळई शुक्रवारी 26 एप्रिल रोजी स्थापन करण्यात येणार आहे.
न्हावा बंदरातून प्रवास करत हा गर्डर वांद्रे-वरळी सागरी सेतू ज्या ठिकाणी मुंबई किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचली आहे. अडीच हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून हा गर्डर आणला आहे. यानंतर मे २०२४ अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसरी मार्गिकेची तुळईची देखील जोडणी करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिली तुळई जोडल्यानंतर दुसरी तुळई आणून नंतर जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
Bandra-Worli Sea Link Mumbai Coastal Road Mumbai Coastal Road News Bandra-Worli Sea Link News Marine Drive Maharashtra News Mumbai Coastal Road Update कोस्टल रोड प्रकल्प कोस्टल रोड अपडेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »