Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. मविआकडून शेकापचे जयंत पाटील ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. मात्र उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीय.
काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. असं असलं तरी विधानसभेतील संख्याबळ काय सांगतंय त्यावर एक नजर टाकुया..- शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात- काँग्रेसचे 36 आमदार आहेत त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 आमदार आहेत तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत. दोघांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो एकंदरीतच काय तर रायगड लोकसभेच्या पराभवाचा राग उद्धव ठाकरे विधानपरिषदेमध्ये आळवण्याच्या तयारीत आहेत.. जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळतं का? आणि ठाकरे गटाचे आमदार खुल्या दिलाने मदत करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.Full Scorecard →
Shetkari Kamgar Paksh Jayant Patil MLA Legislative Council Maharashtra Politics ठाकरेंची नाराजी जयंत पाटील विधान परिषदेची वाट खडतर Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »